Tuesday, July 16, 2013

प. पू. बाबा बेलसरे उवाच !

भगवंताचे दर्शन हे सर्वोत्तम मानवी ध्येय आहे. ते साध्य होण्यास तपश्चर्या करावी लागते. पण ही तपश्चर्या म्हणजे स्नान, दान, वेदाध्ययन, शास्त्राभ्यास, योग, याग, व्रतवैकल्ये, अनुष्ठान, तीर्थाटन किंवा उपासतापासाने शरीरशोषण नव्हे. अध्यात्मामधील तपश्चर्या म्हणजे नीतिधर्माचे आचरण, पवित्र अंतःकरण आणि भगवंताचे अखंड स्मरण हे होय. आपली शक्ती ह्यासाठी कमी पडते म्हणून श्रीसद्गुरूंची मदत मागावी लागते. ती मदत मागताना तिची किंमत द्यावी लागते. ती किंमत म्हणजे "त्याग"- वासनांचा त्याग, विकारांचा त्याग, आसक्तीचा त्याग, ममत्त्वाचा त्याग, कर्मफलाचा त्याग, देहबुद्धीचा त्याग आणि उपाधींचा त्याग. पण ह्या सर्व त्यागाचे मर्म एकाच त्यागामध्ये सापडते. तो त्याग म्हणजे कर्तेपणाच्या अभिमानाचा त्याग होय. 

~~ प.पू. बाबा बेलसरे

No comments:

Post a Comment